*हे कसं सांगू ? आई बाबा ओरडतील!* आज जरा धडधडतच होतं सकाळपासून छातीत. शाळा तर सुटलीय पण घरी जायची जरा भितीच वाटतेय. आज घरी गेल्यावर नक्की काय होईल या विचारानं होत होती धडधड. पण पर्याय काय जावं तर लागणारच. असो.. पावलं घराकडं पडू लागली पण रोजच्या सारखी झपाझप नाही तर अगदी हळूहळू. आणि तरीही आज मात्र घर लवकर आलं. अंगणात आज्जी बसलेली होती काॕटवर,जरा तिरक्या नजरेने बघत होती.तिथंच कल्पना आली आत गेल्यावर काय होणार याची. हिम्मत करून जडजड झालेली पावलं उचलत चार पायऱ्या चढल्या उंबरा ओलांडला आणि कशीबशी आत गेले. इकडं तिकडं बघितलं तर दादा अभ्यास करत होता,बाबा टिव्हीवर बातम्या बघत होते तर आई तिथे दिसत नव्हती म्हणजे नक्की स्वयंपाकघरात असणार. हळूच दप्तर जागेवर ठेवलं.शहाण्या बाळासारखं ताबडतोब आत जाऊन हातपाय धुतले.शाळेचा ड्रेस काढला हळूच स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं आणि गुपचूप सोफ्यावर येऊन बसले. मला वाटलं होतं तसं घरात काहीच घडलं नाही. वाटलं होतं गेल्या गेल्या गालावर दोन सपके बसतील शिक्षा होईल आणि आई फरमान सोडेल आज जेवायला मिळणार नाही. पण इथंतर सगळंच उलटं चाललेलं. मी शाळेतून घरी आलेलं देखील कुणाला कळलं...
*हा प्रवास असा थांबताना* ...... आज मनाशीच बोलत होतो.मन मनाशीच मोकळं करत होतो. का ? का एवढी घाई केली देवा ? अजून जगायचं होतं. खूप काही करायचं होतं. अनेक स्वप्न जी रंगवली होती ती पूर्ण करायची होती. आत्ता कुठे माझ्या पंखात बळ आलं होतं. हळूहळू माझं विश्व विस्तारण्याचा प्रयत्न मी करत होतो. खूप आनंदी होतो. सहचारिणी मनाजोगती मिळाली होती. खूप कठीण प्रसंगात अगदी वाघिणी सारखी उभी राहिली माझ्या मागे म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो. हसतमुखाने घर सांभाळत माझ्या माणसांना आपलंसं करताना तिची होणारी तारांबळ मला कळत होती पण कौतुकही होतं की लढतेय प्रयत्न करतेय. शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या माझ्या या लढतीत तिनं कधी कधी काही मागितलं नाही,हट्ट केला नाही,रूसवा फुगवा नाही. म्हणूनच आता तिचे सगळे लाड पुरवायचे होते. तिच्या सोबत चार निवांत क्षण घालवायचे होते. खूप बोलायचं होतं. तिचं ऐकायचं होतं. सगळं सगळं राहून गेलं. आमची पिलं पण कावरीबावरी झालीयत. आई दिसतेय समोर पण बाबा नजरेस पडत नाही,शोधलं तरी सापडत नाही,फोन सुध्दा उचलत नाही,कुणी काहीच सांगत नाही. आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ कळत न...